आदमापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील सद्गुरु बाळूमामा यात्रेची सांगता !

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील २२ मार्चपासून चालू झालेल्या सद्गुरु बाळूमामा यात्रेची सांगता सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत झाली. ३० मार्च या दिवशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

राज्यात ‘मास्क’चा वापर ऐच्छिक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

नागरिकांना यापुढे सर्व सण-उत्सव उत्साहात साजरा करता येतील. बस, रेल्वे यांमधील प्रवाशांची मर्यादा, हॉटेल-चित्रपटगृह यांची मर्यादा, दुहेरी मास्क आदी सर्व निर्बंध रहित करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा ‘ईडी’कडून ताबा घेण्याची शक्यता !

राज्य सहकारी अधिकोषाने अनेक आजारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज प्रकरणांविषयी ‘ईडी’ सध्या अन्वेषण करत आहे. राज्य सहकारी अधिकोषाच्या ७६ संचालकांवर अशा चुकीच्या कारभाराविषयी ‘ईडी’ची नजर आहे.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूकपदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन !

ही यात्रा १ एप्रिल या दिवशी सांगली येथे सकाळी ७ वाजता मारुति चौक येथून, तर कोल्हापूर येथे बिंदू चौक येथे सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. तरी या मूकपदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

नागपूर येथील अधिवक्ता सतीश उके यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली संपत्ती हडपली आहे, असा आरोप अधिवक्ता उके यांच्यावर आहे. ‘ईडी’ने अधिवक्ता उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीक उके यांना कह्यात घेतले आहे. याआधी नागपूर गुन्हे शाखेने यापूर्वी या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते.

एका नव्या प्रारंभासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी निर्बंध हटवत आहोत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचा प्रारंभ आहे. एक नवीन प्रारंभ करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी निर्बंध हटवत आहोत’, असे म्हटले.

१ एप्रिलपासून कामावर न आलेल्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

संपकरी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी ७ वेळा आवाहन करण्यात आले. यापुढे मात्र जे कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची आवश्यकता नाही, असे आमचे मत आहे. ते शिक्षेस पात्र आहेत.

आतंकवादी आणि पत्रकार !

हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

आर्थिक जिहाद !

हलाल अर्थव्यवस्था राबवून भारतात समांतर अर्थव्यवस्था राबवण्याचा धर्मांधांचा डाव आहे. हिंदू याविषयी टोकाची भूमिका घेत असतांना त्यामागील त्यांचा शुद्ध हेतू समजून घ्यायला हवा. कर्नाटकात त्याला विरोध होऊ लागल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने याची नोंद घेऊन हलाल अर्थव्यवस्थेवर चाप बसवण्यासाठी पावले उचलावीत !

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !