गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढता येतील !

मुंबई – कोरोनानिमित्त राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. ‘मास्क’चा वापर ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे आता गुढीपाडवा साजरा करता येईल, तसेच शोभायात्रा उत्साहात काढता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना टोपे यांनी वरील माहिती दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘नागरिकांना यापुढे सर्व सण आणि उत्सव उत्साहात साजरा करता येतील. बस, रेल्वे यांमधील प्रवाशांची मर्यादा, हॉटेल-चित्रपटगृह यांची मर्यादा, दुहेरी मास्क आदी सर्व निर्बंध रहित करण्यात आले आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी नागरिकांनी स्वत:ची आणि अन्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने ‘मास्क’चा उपयोग करावा.’’
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक