भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली मागणी फिलीपिन्सकडून !

फिलीपिन्सने चीनविरुद्धच्या सैनिकी सिद्धतेसाठी भारत आणि रशियाने संयुक्तपणे सिद्ध केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे !

प्रजासत्ताकदिनाच्या निमंत्रणपत्रिका बनवण्यामध्ये आयुर्वेदाच्या वनस्पतींचा उपयोग !

निमंत्रणपत्रिकांतून आयुर्वेदाच्या औषधींना प्रोत्साहन दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन ! आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक !

‘लिट्टे’साठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलेला अटक

ही महिला श्रीलंकेची रहिवासी असून अनेक वर्षांपूर्वी ती कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे. ही महिला मुंबईकडे जाणार्‍या विमानात बसण्याच्या सिद्धतेत असतांनाच पोलिसांनी तिला अटक केली.

राज्यातील महिला पोलिसांना १२ घंट्यांऐवजी केवळ ८ घंटे काम !

राज्य सरकारने महिला पोलिसांना १२ घंट्यांऐवजी ८ घंटे काम देण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील ! – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे.

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांना एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयातून बाहेर जावे लागले !

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांचा २ अधिकार्‍यांच्या उपस्थितीवर आक्षेप !

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक संमती

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत.

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !

राज्यघटनेतील अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे हटवा !

हिंदूंवर अत्याचार करणारा टिपू सुलतान आणि अकबर यांची चित्रे ‘देश की महान विरासत’ असे नमूद करत राज्यघटनेत देण्यात आली आहेत. ही चित्रे राज्यघटनेतून काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी श्री. अजयसिंह सेंगर यांनी केली आहे.