‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणात पाकचे ५ सैनिक ठार

पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.

पितृपक्षाच्या निमित्ताने देहली येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

मुंबईतील ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणी अभिनेते शाहरूख खान यांच्या मुलाला अटक !

अधिकार्‍यांनी आर्यन खान याचे क्रूझवरील ‘व्हिडिओ’ मिळवले आहेत. एफ्टीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानद यांनाही संपर्क करण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती बिघडली

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक उपचार करत आहे. त्यांना ४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात पुढील तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरामध्ये मांसविक्रीवर बंदी !

शहरामध्ये धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने आणि उपाहारगृहे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात येत असल्याची घोषणा महापौर संयुक्ता भाटिया यांनी केली आहे.

आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे व्यापार्‍याचे अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस निरीक्षक निलंबित

गुंडगिरी करणारे पोलीस !

फरिदाबाद (हरियाणा) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप मुंजाल यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध का करावे ?, श्राद्ध केल्यावर होणारे लाभ’, यांविषयी माहिती दिली.

डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार प्रदान !

विद्वान आणि हुशार भारतीय संशोधक, तज्ञ हे संशोधक वृत्तीने अन् कष्ट करून संशोधन करतात; मात्र भारतात त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते विदेशाची वाट धरतात. प्रज्ञावंतांचा हा उपहास टाळण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत !

ज्येष्ठ साहित्यकार द.मा. मिरासदार यांचे निधन !

मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे १४ एप्रिल १९२७ या दिवशी झाला.