सातारा शहर आणि परिसरात ३२ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याचे काम चालू

पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याविषयी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीतून ३२ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ शहर आणि परिसरात बसवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त येणार्‍या नागरिकांना आमदारांचे पत्र किंवा प्रशासकीय अधिकारी यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा

भारताला भूतकाळच नाही, तर वर्तमानही विसरता येणार नाही. पाकने भूतकाळ विसरण्यास सांगण्यापेक्षा त्याने वर्तमान सुधारले पाहिजे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याच्याकडून भारतात होणार्‍या आतंकवादी कारवाया रोखल्या पाहिजेत !

सातारा येथील सैनिक स्कूलमधील ३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

श्रीलंकेत जेथे सीतामातेला बंदी बनवून ठेवण्यात आले होते, तेथील दगड श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी आणणार !

येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. हा दगड श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे.

रत्नागिरी येथे ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान ऐकल्यावर स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी झालेल्या युवावर्गाने व्यक्त केलेले मनोगत !

दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या या ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांत युवावर्ग उत्साहाने सहभागी झाला. त्यांना प्रशिक्षणामुळे, तसेच प्रशिक्षणाला साधनेची जोड दिल्यामुळे अनेक लाभ झाले.

नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे व्हिडिओ बघण्याने ६ किलोमीटर वाहन चालवण्याएवढे प्रदूषण निर्माण होते !

युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते

केळघर (जिल्हा सातारा) येथे सीमा शुल्क विभागाची धाड

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.

विमा क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला राज्यसभेत संमती !

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी म्हटले की, सरकारने विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल, याची कायद्यात तरतूद केली आहे. ‘येथे या पैसा कमवा आणि पळून जा’ असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

तेलंगाणा सरकारच्या ‘तेलंगाणा सोशल वेल्फअर रेसीडेंशियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोसायटी’चे सचिव प्रवीण कुमार यांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘मी राम, कृष्ण यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. हिंदु धर्म आणि परंपरा यांचे पालन करणार नाही’ अशी शपथ दिली आहे.