महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे, ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही ! – संजय राऊत

सुधीर मुनगंटीवर यांनी विधीमंडळात ‘पुढच्या ३ मासांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ’, असे वक्तव्य केले. हा फाजील आत्मविश्‍वास सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल, तर भाजप स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल.

बाळ बोठे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना नगरच्या पोलिसांनी अटक केली होती.

नगर येथील व्यापारी गौतम हिरण हत्याप्रकरणी ५ आरोपींना अटक

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले असून संदीप मुरलीधर हांडे, जुनेद उपाख्य जावेद बाबु शेख यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील कोविड रुग्णालयातील रुग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची रुग्णांची तक्रार

भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे.

भारतात असे कधी होणार ?

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. तसेच १ सहस्रहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर यांनी दिली.

पू. सदानंद भस्मे महाराज यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

२५.११.२०२० या दिवशी श्री. सदानंद भस्मे महाराज यांना ‘संत’ घोषित करण्यात आले. पू. सदानंद भस्मे महाराज यांचे आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी देवाच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू न केल्यास स्वतःचे आणि देशाचे अस्तित्व धोक्यात ! – अश्‍विनी कुमार उपाध्याय, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘सनातन संवाद’ या कार्यक्रमात ‘लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी अधिवक्ता उपाध्याय यांच्याशी संवाद साधला.

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १४ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.