इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडेरायाची यात्रा रहित

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोनामुळे इतिहासात प्रथमच रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्‍यांना प्रदर्शन न लावण्याचे आदेश दिले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून आता ‘पास’विना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी शेळ-मेळावली येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

‘बैलांच्या ‘धिरयो’ला मान्यता द्यावी’, अशी पेडणे येथील काही बैलांच्या मालकांची शासनाकडे मागणी

‘इतर अवैध व्यवसाय करतात; म्हणून आम्हालाही अवैध व्यवसाय करायला द्या’, ही घातक प्रवृत्ती नष्ट करायला हवी ! सर्वच जण अवैध व्यवसाय करायला लागले, तर पृथ्वीवर गुंडांचेच राज्य येईल.

अभाविपच्या मडगाव शाखेच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद यांच्या खोलीस भेट

१२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अभाविपच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला

जगातील ९ देशांकडून भारताकडे स्वदेशी कोरोना लसीची मागणी !

भारताने कोरोनावरील स्वदेशी लसीची निर्मिती केली असून त्याच्या आपत्कालीन वापराला अनुमती दिली आहे. यानंतर जगातील ९ देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.

गोव्यातील ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताची बांगलादेशसमवेत अधिक प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण

बांगलादेशसमवेत सांस्कृतिक देवाणघेवाण करतांना तेथील मूलनिवासी हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य देणे आणि केवळ हिंदु म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखणे शक्य व्हावे, ही अपेक्षा !

रंगकाम करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेले वेदिक रंगांचे आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे.

धारबांदोडा, उसगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

धारबांदोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल सय्यद या धर्मांधाला पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी मडगाव रेल्वेस्थानकावर अटक करून त्या मुलीची सुटका केली.

(म्हणे) ‘भारताकडून कालापानी, लिपुलेख आदी भाग परत घेणार !  

ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.