तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तेल मिसळणार्‍यांवर कारवाई करावी !

मंचर येथील प्रांत कार्यालयामध्ये निवेदन !

प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

मंचर (जिल्हा पुणे), २३ सप्टेंबर (वार्ता.) – तिरुपती येथील श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदु समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हे महापाप करणार्‍यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंचर येथील प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?