निधन वार्ता 

सनातनच्या साधिका सौ. संगिता मर्दा यांचे वडील बद्रीनारायण शंकरलाल करवा (वय ८४ वर्षे) यांचे १० जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, १ सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

अवैध धंद्यांशी निगडित असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे !

‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.

दिवसाला ६०० जणांचे लसीकरण करणार – पालकमंत्री

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात भागधारक फौजदारी तक्रार करणार

म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले.

शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे, ही काळाची आवश्यकता !  – अमोल बुचडे प्रशिक्षक शिवशाहू मर्दानी आखाडा, कोल्हापूर

शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले.

सोरायसिस, त्वचारोग आदींवर पंचगव्य उत्पादनांद्वारे उपचार करणे शक्य ! – राष्ट्रीय कामधेनू आयोग

रोगांवर पंचगव्य (गायीचे दूध, मूत्र, शेण आदींचे मिश्रण) उत्पादनांद्वारे उपचार करण्यात येऊ शकतात,

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे ! – भाजपचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ झाले

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

१२ ते १६ जानेवारीपर्यंत प्रतिदिन भजन, कीर्तन, प्रवचन, हळदी-कुंकू, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

(म्हणे) ‘काश्मीरला स्वायत्त दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही !’ – पाकचे इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !