बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.
केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता.
बांगलादेशमधील आरोपी भारतात कोणत्या मार्गे आला, याची शासनाने कसून चौकशी करून त्याला कडक शिक्षा करायला हवी !
लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.
पोलिसांच्या घरात मुले-पत्नी, आई-वडील आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर किती ताण टाकायचा याचा विचार करायला हवा. काही भागांत लोक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करत आहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत.
‘व्हाट्सअॅप’वर वाशीतील निवासी कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू ही बातमी प्रसारीत होत आहे, वस्तूतः ही महिला नवी मुंबईतील नसून मुंबईतील गोवंडी येथील होती, असे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेले १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे २६ मार्चला स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे देशात दळणवळण बंद करण्यात आल्याने कामासाठी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर असलेले अनेक जण अडकून पडले आहेत.