पाटलीपुत्र (बिहार) – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. यापूर्वी बिहार सरकारने नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक सहस्र रुपये अनुदान घोषित केले होते. आता सरकारने या आदेशात सुधारणा केली असून राज्यातील सर्व भागांत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागांसह संपूर्ण राज्यात कुठेही वास्तव्य करणार्या कुटुंबांना प्रती कुटुंब १ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे थेट अर्थसाहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > बिहार > बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
नूतन लेख
राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १५.०५.२०२२
चित्रपट करमुक्त करा ! – भाजप चित्रपट कामगार आघाडी, सातारा
‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून हे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करा !
वीजदरात सवलत मिळण्यासाठी राज्यातील काही वस्त्रोद्योगांकडून अपप्रकार करून कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीची लूट !
सरकार संविधान बदलणार असल्याच्या नुसत्या अफवा ! – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद