पुणे येथे पोलिसांकडूनच पोलिसी गणवेश घालण्याच्या नियमांचे पालन नाही

नागरिकांना शिस्तीचे धडे देणारे पोलीसच शिस्त पाळत नसतील, तर अशा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कसा रहाणार ?

शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?

पनवेलच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणार्‍या छोट्या राजनच्या हस्तकाला पुणे येथून अटक

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी परमानंद हंसराज ठक्कर या छोट्या राजनच्या हस्तकाला पुण्याच्या कोंढव्यातून अटक केली आहे.

शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे भेसळयुक्त दूध जप्त

भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

कोल्हापूर येथे चिकित्सालयातील फलकाद्वारे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यम, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये आग

येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.

पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर

पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करावे ! – खासदार उदयनराजे भोसले

प्रशासकीय मान्यता मिळालेला कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.