पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ सोमता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून जेवणाचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.