नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पंचायती आणि ग्रामपंचायती यांना अधिक निधी अन् अधिकार देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नव्याने निवडून आलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायती, तसेच ग्रामपंचायती यांना अधिक निधी आणि अधिकार देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास आमचाही  विरोध ! – दिलीप तळेकर, सभापती, पंचायत समिती, कणकवली

जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पालक मुलांना प्राथमिक शाळेत पाठवणार नाहीत. आमचाही त्याला विरोध असेल, असे कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले

बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवरील छताचा लोकार्पण सोहळा पार पडला !

विशाळगड येथे ३६० वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत उघड्यावर असलेल्या वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने छत उभारण्यात आले आहे.

(म्हणे) ‘गोहत्याबंदी कायद्यातून बैल आणि म्हशी यांना वगळावे !’ – फ्रान्सिस सार्दिन, खासदार, काँग्रेस

कर्नाटक शासनाने संमत केलेल्या गोहत्या बंदी कायद्याचे स्वागत आहे आणि हा कायदा चालूच राहिला पाहिजे; मात्र या कायद्यातून बैल आणि म्हशी यांना वगळणे आवश्यक आहे. अशी मागणी काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील वनसंपदा धोक्यात

मानवाच्या अतिक्रमणामुळे पश्‍चिम घाट धोक्यात आल्याची चेतावणी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन्) संस्थेने नुकतीच भारताला दिली आहे. ‘आउटलूक ३’ या अहवालात संस्थेने हे वास्तव मांडले आहे.

चिंचवड येथे धर्मप्रेमींसाठीचे सोशल मिडिया शिबिर पार पडले

हिंदु जनजागृती समितीच्या शिबिरा अंतर्गत फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर यांचा राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी प्रभावी वापर कसा करावा ?, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला आरक्षणाची सोडत निघणार

कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार !

सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार आहोत, अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासमध्ये होत आहे अपप्रकार !

येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी बंधनकारक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस कार्ड’मध्ये (दर्शनपासमध्ये) अपप्रकार होत असल्याचा आरोप श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी केला आहे.