धाराशिव येथे ७१ जणांना विषबाधा !

प्रतीकात्मक चित्र

धाराशिव – उमरगा तालुक्यातील कराळी येथे १५ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात जेवल्यानंतर ७१ जणांना विषबाधा झाली आहे. उलटी आणि जुलाबाचा त्रास चालू झाल्यानंतर १६ रुग्णांना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर अन्य जणांना विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार चालू केले आहेत.

लखनऊ येथील वरिष्ठ आहारतज्ञ डॉ. पूनम तिवारी म्हणाल्या, ‘‘उष्ण हवामानात वेगवेगळे जिवाणू वेगाने वाढल्यामुळष अन्न लवकर खराब होते. उच्च तापमानामुळे दूध, दही, मांस, शिजवलेल्या भाज्या आणि डाळी लवकर खराब होऊ लागल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. काही लोक उन्हाळ्यात बाहेरचे अन्न (पाणीपुरी, कापलेली फळे किंवा रस) पुष्कळ खातात, जे दूषित असू शकते. उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता वाढते; परंतु अनेक वेळा लोक फिल्टर न केलेले किंवा उघड्यावरील पाणी पितात, ज्यामुळे शरीर जिवाणू आणि विषाणू यांना बळी पडते.’