पंच, साक्षीदार यांमुळे विभागीय चौकशी निष्फळ ठरत असल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर – लाचखोर शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची न्यायालयीन अन् विभागीय चौकशी केली जाते. यातील विभागीय चौकशीचा नियमच रहित करण्याचा विचार चालू आहे. पंच आणि साक्षीदार सुनावणीला उपस्थित रहात नाहीत किंवा चौकशी अधिकार्यासमोर पंच, साक्षीदार अनावश्यक गोष्टी सांगतात. त्या आधारे आरोपी सुटतो. हा निकाल न्यायालयीन चौकशीत मोडतो. यामुळे तेथेही तो निर्दोष सुटण्याची शक्यता निर्माण होते, असे सरकारचे मत आहे. याविषयी सामान्य प्रशासन विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. यात विभागीय चौकशी रहित करणे योग्य ठरेल काय ?, तसेच त्याच्या भविष्यातील परिणामांविषयी सर्व विभागीय चौकशी अधिकार्यांचे अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका :
|