राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या

पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !

राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या माहिम (मुंबई) येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या मूर्ती गायब !

चौकशी अहवालात सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने विश्वस्तांवर गंभीर मते नोंदवूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ !

मैसुरू (कर्नाटक) येथील महादेवम्मा मंदिर पाडल्याच्या विरोधात विहिंप आणि बजरंग दल यांचे सरकारच्या विरोधात आंदोलन !

भाजप सत्तेवर असलेल्या राज्यात मंदिरे पाडली जाणे आणि त्याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करावे लागणे अपेक्षित नाही !

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमण !

पाकचे पंतप्रधान पाकमधील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याच्या मोठमोठ्या बाता मारतात, तसेच भारतातील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या कथित अत्याचारांवरून उर बडवत असतात. त्यांना अशा घटना का रोखता येत नाहीत ? हे त्यांनी सांगायला हवे !

राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेणार्‍या श्री राजपूत करणी सेनेचे अभिनंदन ! मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारू पहाणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

बांगलादेशमध्ये धर्मांध तरुणाकडून शिवमंदिरातील शिवाच्या २ मूर्तींची तोडफोड !

बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याने तेथे अशाच घटना घडणार; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी भारतातही अल्पसंख्य धर्मांधांकडून अशा प्रकारची तोडफोड केली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये शेकडो कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार, भूमींचे अपव्यवहार, दागिन्यांची चोरी आदी अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे.

चारधामचे प्रस्तावित सरकारीकरण रहित करण्याची मागणी

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे चर्च आणि मशिदी यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस का दाखवत नाही ?