देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

नरक चतुर्दशी

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

‘दीप’

‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवाळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.

भाऊबीज (यमद्वितीया)

‘या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

तुळशी विवाह

श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.