लाचलुचपतीवर कुचकामी प्रतिबंध !

सरकारी कार्यालये ही भ्रष्‍टाचाराची उगमस्‍थाने आहेत, हे कुणालाही अमान्‍य नसावे !

भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्‍ट्रात मागील ९ वर्षांत केलेल्‍या कारवाईच्‍या ९४.११ प्रकरणांतील आरोपी सुटले आहेत. यात दोष सिद्ध होण्‍याचे प्रमाण केवळ ५.८९ टक्‍के इतकेच आहे.

Exclusive: ‘भ्रष्टाचारी’ म्हणून पकडलेले ९४ टक्के आरोपी सुटतात, तर ८५ टक्क्यांहून अधिक पुन्हा शासकीय सेवेत रूजू होतात !

लोकहो, भ्रष्टाचार का थांबत नाही ? हे लक्षात घ्या ! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाड पडल्यास ‘एका भ्रष्टाचार्‍याला शिक्षा झाली’, असा राष्ट्रप्रेमी नागरिकांचा समज होत असेल, तर या वृत्तावरून हा अपसमज दूर होईल !

नागपूर येथील व्‍यापार्‍यांनी सडकी सुपारी आयात करून म्‍यानमारसह ईशान्‍य आशियातील सीमाशुल्‍क चुकवला !

सडकी सुपारी आयात केल्‍याप्रकरणी आरोपी वसीम बावला याला न्‍यायालयाने ३० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे.

लाच स्‍वीकारणारा साहाय्‍यक उद्यान निरीक्षक निलंबित !

उद्यानाच्‍या कामाचे देयक संमत करून त्‍याचा लेखापरीक्षण अहवाल देण्‍यासाठी १७ लाख रुपयांची लाच स्‍वीकारतांना महापालिकेचे साहाय्‍यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जून या दिवशी कह्यात घेतले होते.

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.

गुन्हा नोंद न करण्याच्या मोबदल्यात शासकीय अधिकार्‍याने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली ५ सहस्र रुपयांची लाच !

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने ही कारवाई केली. (भ्रष्टाचाराची कीड कधी समूळ नष्ट होणार ?)

जत (तालुका सांगली) तलाठी संघटनेच्‍या अध्‍यक्षांवर दुसर्‍यांदा लाच घेतांना गुन्‍हा नोंद !

प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्‍चपदस्‍थ अधिकार्‍यांपर्यंत भ्रष्‍टाचार मुरला आहे. साधी कामे करण्‍यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्‍टाचारमुक्‍त करू शकलेला नाही. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !

ठाणे विभागात साडेपाच मासांत लाचखोरीचे ५० गुन्‍हे !

या गुन्‍ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्‍यांसह एकूण आरोपींची संख्‍या ७० आहे. एकाही गुन्‍ह्यामध्‍ये न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍यात आलेले नाही. ४९ गुन्‍हे हे तपासाधीन आहेत. गेल्‍या वर्षीपेक्षा ही संख्‍या ११ ने वाढली आहे.