आतापासून पावसाळा चालू होईपर्यंत नियमित दही खाणे टाळावे !
‘वसंत, ग्रीष्म आणि शरद हे ३ ऋतू, म्हणजे वर्षातून ६ मास (साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर अन् ऑक्टोबर) दही खाऊ नये’, असे आयुर्वेद सांगतो. पावसाळा आणि थंडी या दिवसांतच दही खाता येते. आता थंडी संपून वसंत ऋतू चालू झाला आहे.