अहमदनगर जिल्‍ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्‍वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्‍यक्ष

अन्‍यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार टाकण्‍याची चेतावणी !

अहिल्‍यानगर – नेवाशाचे ‘ज्ञानेश्‍वरनगर’ नामांतरण करण्‍यासाठी आता राज्‍य सरकारने पुढाकार न घेतल्‍यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार टाकण्‍यात येईल, अशी चेतावणी समर्पण फाऊंडेशनचे अध्‍यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी निवेदनातून दिली आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथे ज्ञानेश्‍वरी सांगितलेली आहे. त्‍यामुळे नेवासा शहराचे नामांतरण होणे आवश्‍यक आहे. नेवाशाचे ‘ज्ञानेश्‍वरनगर’ नामांतरण व्‍हावे, अशी वारकरी संप्रदायाबरोबरच नागरिकांचीही मागणी आहे. याविषयी अनेकांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला आहे; मात्र त्‍याकडे सरकारने कानाडोळा केलेला आहे.

संपादकीय भूमिका 

अशी मागणी का करावी लागते ?