कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट
पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मेरा भारत महान’ वगैरे जयघोषाने काहीही होणार नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली करण्यासाठी प्रत्येक भारतियाने कठोर परिश्रम करून वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाचा अंगीकार करावा, हा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक श्री. नारायण मूर्ती यांनी केले.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह समाजमंदिर उभारणे, नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात दरोडेखोरांनी घरफोड्यांचे सत्र चालू केले असून २३ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यात ४ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील ललगुण आणि डिस्कळ, तर सातारा तालुक्यातील निगडी आणि तामजाईनगर, शाहूपुरी येथे या घरफोड्या झाल्या आहेत.
सातारा येथील मतकर कॉलनीमध्ये झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे प्राप्त व्हावीत; म्हणून ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत सातारा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ७ लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुणे येथे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड- दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
खलिस्तानवादी आता उघडउघडपणे त्यांच्या फाळणीच्या उद्दिष्टाला लोकमान्यता मिळवू पहात आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! सरकार आता तरी खलिस्तानी वळवळ ठेचून काढणार का ?
खलिस्तान्यांनी पोलीस ठाण्याला सहस्रोंच्या संख्येने सशस्त्र होऊन वेढा घातल्यावर पोलीस अशी माघार घेणार असतील, तर खलिस्तानवाद्यांचे मनोबल वाढून राज्यात त्यांची दहशत निर्माण होण्यास खतपाणी मिळणार आहे.