‘खलिस्तानच्या आमच्या उद्दिष्टाकडे निषिद्ध म्हणून पाहू नये !’ – खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह

अमृतपाल सिंह

अमृतसर – खलिस्तानचे आमचे उद्दिष्ट वाईट आणि निषिद्ध म्हणून पाहिले जाऊ नये, असे फुत्कार ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने सोडले. ‘बौद्धिक दृष्टीकोनातून त्याचे भूराजकीय लाभ पाहिले पाहिजेत. ही एक विचारधारा आहे आणि विचारधारा कधीच मरत नाही. आम्ही ते (खलिस्तान) देहलीहून मागत नाही’, असेही पुढे त्याने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवादी आता उघडउघडपणे त्यांच्या फाळणीच्या उद्दिष्टाला लोकमान्यता मिळवू पहात आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! सरकार आता तरी खलिस्तानी वळवळ ठेचून काढणार का ?