नवी मुंबई – महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटींहून रकमेची वसुली झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्र, तसेच मोरबे धरण ते कळंबोली मुख्य जलवाहिनी ज्या गावांतून जाते, त्या ग्रामस्थांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेद्वारे एकूण १ लाख ३८ सहस्र ६२ ग्राहकांना पाणीपुरवठा केला जातो. यांतील सहस्रो ग्राहक नियमितपणे पाणीदेयक भरून महापालिकेस सहकार्य करत असतात; मात्र काही ग्राहकांकडून विविध कारणांमुळे पाणीदेयक थकवले गेले आहे. अशा थकबाकीदार ग्राहकांकडून ५० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी येणे शिल्लक होती. यावर २१ कोटी ५९ लाख विलंब शुल्क आणि ९९ लाख ५९ सहस्र रुपये दंडात्मक रक्कम अशी मिळून ७३ कोटी ७३ लाख रुपये येणे बाकी होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटीहून अधिक रकमेची वसुली
‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटीहून अधिक रकमेची वसुली
नूतन लेख
- नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे
- हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारताच भगवा ध्वज परत उभारला !
- पुणे येथे बुलेट चोरणार्या युवकाला अटक !
- पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांच्यासह दोघे निलंबित !
- श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे अल्पवयीन मुलावर ९ अल्पवयीनांचा अत्याचार !
- पुणे येथे ५ घरे आणि १ दुकान आगीत भस्मसात