विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्‍या खर्चास मान्‍यता !

अतिक्रमण काढण्‍याचा सर्व व्‍यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्‍यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.

संभाजीनगर येथे शाळेचे शुल्‍क ४० टक्‍के वाढवल्‍याने पालकांचे ठिय्‍या आंदोलन !

शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनानेच जाणूनबुजून शुल्‍क वाढवले आणि पालकांनी विरोध केल्‍यावर ती चूक मुद्रणालयावर ढकलली. पालकांनी संघटितपणे लढा दिल्‍यामुळे शाळेचे व्‍यवस्‍थापन वठणीवर आले. यापुढे पालकांनी असाच वैध मार्गाने लढा चालू ठेवावा.

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील ! – विशाळगड संवर्धन समिती

विशाळगडाच्‍या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्‍य स्‍मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे.

(म्‍हणे) ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’तील प्रक्षोभक भाषणांवर कारवाई करा !’ – हुसेन दलवाई, माजी खासदार

‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’विषयी पोटतिडकीने बोलणारे मुसलमानप्रेमी माजी खासदार हुसेन दलवाई धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांविषयी साधा ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही !

स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. भावी हिंदु राष्ट्रात ‘स्वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

मंदिरांचे पावित्र्य कोण राखणार ?

महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार धार्मिक स्‍थळापासून  ७५ मीटरच्‍या आत मद्यालये उभारण्‍यावर बंदी असल्‍याने त्‍यापुढे मद्यालये उभारण्‍यात आल्‍याने काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍याभोवती मद्यालयांचा विळखा पडला आहे.

३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे ? हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत ? ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे.