भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठवली औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची सूची !

औरंगजेब क्रूर आणि हिंद्वद्वेषी नव्हता, हे पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘औरंगजेब क्रूर असता, तर त्याने विष्णूचे मंदिर तोडले असते’, असे विधान केले होते. यावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी औरंगजेबाने पाडलेल्या हिंदूंच्या मंदिरांची सूची आमदार जितेंद्र आव्हाड यांना पाठवली आहे.

कोपरगाव (नगर) येथील शिवभक्त अरविंद महाराज अनंतात विलीन !

येथील बालब्रह्मचारी शिवभक्त अरविंद महाराज यांचे २ जानेवारी या दिवशी दुपारी ३.२५ मिनिटांनी महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर ३ जानेवारीला दुपारी १ वाजता बाजारतळ भागातील श्री लक्ष्मीआई मंदिराजवळील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे मोर्चा !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदू सहभागी झाले होते.

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळेच्या समर्थनार्थ निघणार्‍या मोर्चास पोलिसांनी अनुमती देऊ नये ! – सकल हिंदु समाजाची मागणी

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद असून त्यांची पत्नी अद्याप पसार आहे. त्यांची संपत्ती, तसेच गेल्या १० वर्षांत केलेल्या कारभाराचे अन्वेषण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली आहे.

ऑस्ट्रेलियातील गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी भित्तीपत्रके चिकटवली !

खलिस्तानी आतंकवाद कॅनडा, अमेरिका आदी देशांत फोफाववला असतांना भारत सरकारने तो नष्ट करण्यासाठी काहीही पावले न उचलल्यामुळे तो आज जगात फोफावत आहे.

न्यायालयात न जाता शेतभूमी आणि वहिवाट यांतील वाद सुटण्यासाठी राज्यशासनाची ‘सलोखा योजना’ घोषित !

शेतभूमीच्या मालकी हक्काविषयीचे वाद, रस्त्याचे वाद, शासकीय अभिलेखातील चुकीच्या नोंदणीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमण, भावकींमधील वाद मिटण्यासाठी राज्यशासनाने ‘सलोखा योजना’ घोषित केली आहे.

वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !

वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.

पंतप्रधान मोदी यांची २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथील तालकटोरा मैदान येथे २७ जानेवारी या दिवशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने ट्वीट करून दिली.