नगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली चालू

अहमदनगरचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली चालू केल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडून नगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवली आहे.

सीमेवर पाकिस्तानी घुसखोर ठार

येथे सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. घुसखोराकडे बंदूकही होती. सीमा सुरक्षा दलाने मृतदेह कह्यात घेऊन पुढील कारवाई चालू केली आहे. तस्करीच्या उद्देशाने तो भारतीय सीमेत घुसला असावा, असा अंदाज आहे.

‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्या, या मागणीसाठी कोल्हापूर येथे जैन समाजाचा मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. तरी तो रहित करून ‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी येथे जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

सिंधुदुर्ग : बांदा येथे ८ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.

मागण्या मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याची ‘मार्ड’ची चेतावणी !

संभाजीनगर येथील निवासी आधुनिक वैद्याच्या संपाचा दुसरा दिवस !

पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट केला आहे.

तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.

मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय

कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला.

इतिहास पालटण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा निषेध करावा तितका थोडा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानाचे प्रकरण

बंगालमध्ये ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर अज्ञातांकडून दगडफेक  

मालदा (बंगाल) येथे ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. त्यामुळे ‘सी-१३’ डब्याची हानी झाली.