
कोल्हापूर – झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. तरी तो रहित करून ‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी येथे जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोच्र्याचे नेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वाजी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. निर्णय न पालटल्यास देहलीत मोठा मोर्चा काढण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.

केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या पर्वताच्या आजूबाजूला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे पारसनाथ अभयारण्य हे जैन धर्माचे पवित्र स्थळ आहे. आता तेथे उपाहारगृह आणि ‘रिसॉर्ट’ चालू करण्यास अनुमती दिल्याने तेथील पावित्र्य नष्ट होईल. तरी सम्मेद शिखरजीला धार्मिक स्थळाचा दर्जाच मिळणे आवश्यक आहे.

या प्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, दक्षिण भारत जैन सभेचे माजी सदस्य पद्माकर कापसे, राहुल चव्हाण, संजय शेटे, सुनील पाटील यांसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)