नवी देहली – कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला. सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सार्वजनिक पदांवर कार्यरत लोकांच्या भाषणस्वातंत्र्याची मार्गदर्शिका सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. उत्तरप्रदेशातील तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आझम खान यांनी जुलै २०१६ मध्ये बुलंदशहरातील सामूहिक बलात्काराला ‘राजकीय कटा’ची उपमा दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय
मंत्र्यांच्या विधानांसाठी सरकार नाही, तर स्वतः मंत्रीच उत्तरदायी ! – सर्वाेच्च न्यायालय
नूतन लेख
- लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान
- अयान पठान याच्याकडून हिंदु प्रेयसीला अमानुष मारहाण; जखमांवर तिखट टाकले !
- कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !
- Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !
- Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !