धाराशिव येथील मदरशामध्ये आढळले ३४ शाळाबाह्य विद्यार्थी !

मदरशामध्ये ८० मुली शिक्षण घेत असल्याची नोंद असतांना शिक्षण विभागाच्या पथकाला प्रत्यक्षात एकही मुलगी आढळली नाही. ३४ मधील १७ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.  

ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !

ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती.

भोपाळमध्ये वायूगळतीमुळे १५ जणांची प्रकृती बिघडली

मदर इंडिया कॉलनीतील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी क्लोरीन सिलिंडरमधून वायूगळती झाल्याने काही नागरिकांना खोकला आणि श्‍वास घेतांना त्रास जाणवू लागला.

पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर अमेरिकेत हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक बनवेन !

हिंदू, भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर वॉशिंग्टनमध्ये ‘हिंदू होलोकॉस्ट’ स्मारक (हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक) बनवेन. 

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आझम खान यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याचसमवेत ६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात.

आनंदी, उत्साही आणि हसतमुख सौ. वृंदा वीरेंद्र मराठे !

कार्तिक शुक्ल तृतीया (२८.१०.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा वीरेंद्र मराठे यांचा ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये काव्यरूपात पुढे दिली आहेत.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वाडा येथील आदिवासी भागांत फराळ आणि फटाके यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.