सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे !  – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे.

देशविरोधी घटनांचा निषेध करत ठाणे, उल्हासनगर आणि मुलुंड येथे हिंदुत्वनिष्ठांची पदयात्रा !

दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी पदयात्रा आल्यावर हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत सर्व जाती-पंथाचे लोक, तसेच पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिर्डी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन !

‘साईबाबा संस्थान’चे श्री साईबाबा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी अन् भारत सरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत २५ जुलै या दिवशी ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्रालयात कामासाठी येणार्‍या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम सिद्ध करण्यात येणार आहे. पूर्वी चालू असलेली लोकहिताची कामेही चालू ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनावरील ताण न्यून व्हावा, यासाठी रिक्त पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी !

केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून ‘सिंगल यूज’ (एकदा वापरायच्या) प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्लास्टिक लेपीत (कोटिंग) आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला अनुमती द्या ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

‘‘सांगली जिल्ह्यातील शिराळ्याची नागपंचमी ही भारतीय संस्कृतीची एक वेगळी ओळख असून अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या परंपरेला जतन करणे आवश्यक आहे. या सणावर मागील काही वर्षांपासून निर्बंध आहेत.

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

पोलिसांना घराची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागांतील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील, यासाठी तात्काळ अन् दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा’, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिला.

आक्रमणामागे ‘पी.एफ्.आय.’चा हात आहे का ?  याचा पोलिसांनी छडा लावावा ! – हिंदु जनजागृती समिती

होंडा (गोवा) येथे पेट्रोलपंपावरील हिंदु कर्मचार्‍यावर आक्रमण केल्याचे प्रकरण