कराड येथे नागरिकांना पुन्हा दिवसातून २ वेळा पाणीपुरवठा होणार !

पाण्याची नासाडी करणारे आणि नळाला मोटार लावणार्‍यांवर कारवाई करणार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमात ‘बॉयलर’चा स्फोट : एकाचा मृत्यू !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आश्रमात १४ जानेवारी या दिवशी बॉयलरमध्ये अन्न शिजवत असतांना हा स्फोट झाला.

‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे !

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर बनले ‘राम सिम्हन’ !

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नी लुसिम्मा यांच्या उपस्थित विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’ या नावाचे ओळखले जातील.

नागपूर येथे भाजीपाला आणि कापसाचे पीक यांना गारपिटीचा फटका !

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवरचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपवून महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांना ११, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. एका वर्षानंतर अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामीजींचे विचार प्रेरणादायी ठरले ! – डॉ. सुनील बोधे, निवृत्त ब्रिगेडियर

त्यागभाव आणि सेवाभाव याचा आदर्श आताच्या तरुण पिढीने आपल्या आचरणात आणला पाहिजे. भारत आध्यात्मिक देश असून येथे प्रेम आणि शांती नांदते. युवा एकत्र आले, तर संपूर्ण विश्व शांतिमय होईल.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील अर्पण पेटीत भाविकांकडून १ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक अर्पण !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन सिमतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील १२ अर्पण पेट्यांमधील अर्पणाची मोजणी पूर्ण केली असून त्यातून एकूण १ कोटी ६० लाख ६४ सहस्र ६४३ रुपये अर्पण मिळाले आहेत.

सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध असून शिक्षणाचे दायित्व कोण घेणार ? – प्रा. सचिन काळबांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, आर्.टी.ई. फाऊंडेशन

अचानक ‘शाळा बंद’चा आदेश आला. या निर्णयामुळे  राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व कोण घेणार ?