कोरोनाचे लसीकरण ऐच्छिक असून लसीमुळे कोणताही धोका नाही ! – डॉ. शेखर साळकर

‘कोवेक्सीन’ या कोरोनाच्या लसीमुळे कुणालाही धोका उद्भवणार नाही; मात्र लसीविषयी कुणालाही शंका वाटत असल्यास त्याने संपूर्ण लसीकरण प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी लसीकरण प्रक्रियेतून बाहेर पडणे योग्य ठरेल.

गोव्यात अल्प कालावधीत सर्वांनाच लस देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात अल्प कालावधीत १०० टक्के लोकांना लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. राज्याचे क्षेत्रफळ लहान असल्याने, याचा लाभ लसीकरणाच्या वेळी होणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’सह ‘रिमोट कंट्रोल’वर चालणारी उपकरणे वापरण्यावर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’, ‘पॅराग्लायडर्स’ यांसह रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या ‘मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियएल मिसाईल’ आदी यंत्रणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

स्वागतार्ह निर्णय !

या निर्णयामुळे इस्लामी ग्राहकांपुढे हिंदू ग्राहकांना टिकवायचे कि नाही, हाही विचार आता कालांतराने हलाल प्रमाणपत्र घेणार्‍या आस्थापनांना करावा लागेल, हे निश्‍चित ! या निर्णयाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध करण्यासाठी देण्यात येणार्‍या पुढील लढ्यासाठी निश्‍चितच बळ मिळेल, यात शंका नाही.

सत्तेच्या बाजारात विकली गेलेली मृत पत्रकारिता !

आजचा लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रा झाल्याने विकला गेला आहे. लेखक आणि पत्रकार यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, ‘ते जिवंत असल्याची जाणीव समाजाला नसेल, तर ते सर्व मृत असल्यासारखे आहेत.’

मंदिरांच्या भूमीवरील अवैध नियंत्रण हटवून ती मुक्त करावी !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

२ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारा आणि तोडफोड करणार्‍यांकडून पैसे वसूल करा !

भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !

गोपालनाचे अर्थकारण !

कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.

देवता आणि हिंदु जनता यांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करायला हवा !

‘सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करणारा आणि एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याला धडा शिकवणार्‍या हिंदूरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! समाजाला योग्य दृष्टीकोन देण्यासाठी अशा संघटनांची आवश्यकता आहे.