मुंबई – राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी वर्ष २०११ मध्ये तत्कालीन कृषीमंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत काही अधिकार्यांना निलंबित करण्याची घोषणा केली; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. ठिबक आणि स्प्रिंकलर संचाच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला काही तक्रारी मिळाल्या. त्या आधारावर कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून संचालनालयाने काही कागदपत्रे मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता
राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता
नूतन लेख
- 7 Crores Cash Tempo: आंध्रप्रदेशमध्ये अपघातात टेम्पो उलटल्याने त्यात सापडले ७ कोटी रुपये !
- भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !
- (म्हणे) ‘ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासह मी जाणार नाही !’ – शरद पवार
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त ! ; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! …
- चार धाम यात्रेला प्रारंभ : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले !
- केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत