मुंबई – राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी वर्ष २०११ मध्ये तत्कालीन कृषीमंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत काही अधिकार्यांना निलंबित करण्याची घोषणा केली; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. ठिबक आणि स्प्रिंकलर संचाच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला काही तक्रारी मिळाल्या. त्या आधारावर कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून संचालनालयाने काही कागदपत्रे मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !