सीमा भागातील कन्नडसक्ती दूर करा !

बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित केला जाणार !

जे जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामी इंडोनेशियाला शक्य आहे, ते धर्मनिरपेक्षतावादी भारताला का शक्य होत नाही ?

मऊ (उत्तरप्रदेश) येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खंडित अवस्थेत आढळला

सराय लखंसी क्षेत्रातील खानपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खंडित अवस्थेत आढळल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. २३ नोव्हेंबरला ही घटना घडली.

पाकिस्तानकडे देश चालवण्यासाठीही पैसे नाहीत ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

पाककडे देश चालवण्यासाठी पैसे नाहीत; मात्र जिहादी आतंकवाद्यांना पोसण्यासाठी आणि त्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी, सैन्यावर वारेमाप व्यय करण्यासाठी पैसे आहेत, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ?

अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही कि गांजा अन् बाँब बनवण्याचे साहित्य विकण्याला त्यांची अनुमती आहे ?

सतत पडणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची हानी : हानीभरपाई द्यावी, अशी शासनाकडे मागणी

अवेळी पडत असलेल्या पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांचीही हानी होत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

आंबोली परिसरातील हॉटेलवर पोलिसांची धाड : हॉटेल मालकासह ३४ जणांवर कारवाई

कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने चालू केली नसतांना हॉटेल आदी चालू केल्याने झालेले दुष्परिणाम !

गोव्याच्या इतिहासात प्रथमच खाण क्षेत्रांचा लिलाव होणार

गोव्यातील पहिल्या गटातील खाण क्षेत्रांचा लिलाव करण्याची पूर्वसिद्धता चालू आहे. डिसेंबर मासाच्या मध्यापर्यंत ५ ते ८ खाण क्षेत्रांचा लिलाव करण्यात येईल.

‘सनबर्न’ला अनुमती नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर संस्कृतीचे आणि सामाजिक शांततेचे भंजन करणार्‍या कार्यक्रमांना कायमचेच हद्दपार करावे, अशी संस्कृतीप्रेमींची अपेक्षा आहे !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे शासनकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’