धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो.