नागपूर येथे कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर यांंनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !

आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये ! – सैन्यदलप्रमुख नरवणे यांची चीनला चेतावणी

भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्‍न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !

जनभावनांचा आदर करून मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला एका गटाचा विरोध होता आणि हा गट इतरांची दिशाभूल करत होता. आयआयटी प्रकल्पाचे लाभ सांगूनही लोकांना ते पटले नसल्याने शासनाला आता तेथील प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !

आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

नॉर्वेमध्ये ‘फायझर’ची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांपैकी १३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत देशात ३३ सहस्र लोकांपैकी २९ लोकांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यांतील २३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात १३ जणांचा लसीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ‘रायटर’ महिलेला ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान !

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले.