संभाजीनगर येथे बनावट मतदान करण्यासाठी आलेले तिघे जण पोलिसांच्या कह्यात

मयत भास्कर जयाजी ढोले (वय ६२ वर्षे) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आली होती. त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्र होते. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.

सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !

राज्याचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे नाहीत ! – अनिल देशमुख

भाजपकडून धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी १४ जानेवारी या दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

न्यायाच्या प्रतीक्षेत रामसेतू !

भारतीय पुराणशास्त्रानुसार सीतामातेच्या शोधार्थ रामेश्वरम् ते श्रीलंका असे जाणार्‍या श्रीरामाने वानरांच्या साहाय्याने दिव्य असा हा सेतू उभारला होता आणि रावणावर स्वारी केली होती, अशी त्याची महती आहे. अशा आशयाचे अनेक संदर्भ मिळाले, तरी तथाकथित धर्मवाद्यांना ‘हा रामसेतू खरा आहे कि खोटा ?’, असा प्रश्न पडतोच.

रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष निजाम सय्यद यांच्याकडून हिंदु धर्मविरोधी लिखाणाविषयी जाहीर क्षमायाचना !

अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केले असते का ?

२५ जानेवारीपासून गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन

२५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही.

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी ७० टक्के मतदान : मतदान शांततेत !

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेले मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर १ सहस्र ८७ गावकारभार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ जानेवारीला होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्याची चौकशी

रस्ता अपघातानंतर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर ‘गोमेकॉ’त उपचार चालू आहेत. या वेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांना त्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे सांगितले.