काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

ठाणे – मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीत वर्ष २०१४ पासून अनेक घोटाळे उघड केले; मात्र एकही उत्तर द्यायला प्रशासन सिद्ध नाही. हे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्य शासनाकडे दाद मागू अन्यथा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू असे, प्रमोद सामंत यांनी या वेळी सांगितले.
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे