‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !

ब्रिटनमधील खासदाराच्या तक्रारीनंतर ‘बीबीसी’ने जम्मू-काश्मीर वगळून दाखवलेले भारताचे मानचित्र मागे घेत केली क्षमायाचना !

भारताच्या चुकीच्या मानचित्राला ब्रिटनमधील खासदार विरोध करतो; मात्र भारत सरकार आणि भारतातील खासदार विरोध करत नाहीत, हे लज्जास्पद !

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

गुजरात सरकारकडून ‘ड्रॅगन फ्रूट’ फळाचे ‘कमलम्’ असे नामांतर !

गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता केंद्र सरकारनेही याविषयीचे निर्णय घ्यावेत !

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

हिंदु धर्माचा अवमान करणे, देवतांचे विडंबन, साधू-संतांच्या हत्या यांच्या विरोधात कठोर कायदा केंद्र आणि राज्य येथे पारित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांनी केली आहे.

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आणि कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निमखेडी (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक !

१९ जानेवारी या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.