जळगाव – १९ जानेवारी या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एका पोलीस अधिकार्यासह ३ पोलीस कर्मचारी किरकोळ घायाळ झाले आहेत. येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.
१८ जानेवारी या दिवशी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी गावातील मुख्य चौकात एका ठिकाणी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत पुतळा अनधिकृतपणे बसवलेला असल्याने तो हटवण्याची विनंती केली; मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ‘पुतळा याच ठिकाणी राहील’, अशी आग्रही मागणी गावकर्यांनी लावून धरली. तहसीलदार श्वेता संचेती ग्रामस्थांची समजूत घालत असतांनाच अचानक दगडफेकीला प्रारंभ केला.
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !