साखर कारखाना उसाची तोडणी करत नसल्याने शेतकर्‍याने उसाच्या शेताला लावली आग !

करंजगावातील शेतकर्‍यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला, तर राजकीय विरोधातून ही ‘स्टंटबाजी’ केली जात आहे, असे साखर कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ ई-रिक्शा भेट !

दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्‍या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला.

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाची आरोग्य विभागाकडून तपासणी

राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे.

हानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देऊ ! – कृषीराज्यमंत्री

गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून गर्दी जमवणार्‍या भाजपच्या २ पदाधिकार्‍यांसह ‘डी’ मार्टवर गुन्हा नोंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात नियमावली जाहीर

शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याच्या कारणावरून एक शिवप्रेमी नागरिक अभिजित नाईक यांनी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनामुळे कन्हैया कुमार याचे व्याख्यान रहित !

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

अमरावती येथील श्री अंबादेवीचे मंदिर रात्री साडेसात वाजेपर्यंतच खुले रहाणार !

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, उपाहारगृह, बाजारपेठ आदी आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

शासनाकडून पोलीस महासंचालकांना पत्र जाऊनही अद्याप कारवाई नाही !

श्री भवानीदेवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने केलेल्या चौकशीचा अहवाल घोषित करावा, दोषींना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून असा अपहार भविष्यात कुणी करण्याचे धैर्य करणार नाही.