राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांच्या अन्वेषणासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले उद्योग कोणत्या कारणांमुळे गेले याचे अन्वेषण करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.