जिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला !

ट्रक पहाटे नदीत कोसळून चालकाचा मृत्यू

राजूर (चंद्रपूर), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील वर्धा नदीवरील पुलावरून एक ट्रक पहाटे नदीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला. पावसाळ्यात पुलावरील काढलेले कठडे परत न लावल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे या मार्गाचे दायित्व आहे.