दोडामार्ग तालुक्यातील बेसुमार वृक्षतोडीच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – फ्रान्सिस लोबो, स्थानिक भूमीमालक

तालुक्यात न्यायालयाने वृक्ष तोडण्यावर संपूर्णत: बंदी घातली आहे. असे असतांना तालुक्यात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून अनेक ठिकाणी वन विभागाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे.

दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्ष तोडण्यास बंदी

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार दोडामार्ग आणि सावंतवाडी या २ तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्ष तोडण्यास बंदी घातल्याची माहिती ‘सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती’चे आणि साहाय्यक वनसंरक्षक सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ गावे येथे वृक्षतोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रात अवैधरित्या होणार्‍या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती’ सिद्ध  करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील (पुणे) मोशी कचरा डेपोच्या पाठीमागील गायरान जागेवरील शेकडो झाडे तोडली !

शेकडोंच्या संख्येत झालेल्या वृक्षतोडीचे दायित्व कुणाचे आणि त्यातून झालेली पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार ?

बेंगळुरू येथे ‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेची कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या करणार्‍याला फाशी देण्याची मागणी 

‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेने कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली.

‘अमृतवृक्ष’ संकल्पना घरोघरी पोचवा ! – सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (एक वृक्ष आईच्या नावावर) या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या संकल्पनेवर राज्य सरकारच्या वनविभागाद्वारे काम चालू झाले आहे.

विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

अनुमतीपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘मेट्रो इको पार्क’मध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केली असल्याचा आरोप !

निवडणूक आयोगाचे गोदाम बांधण्यासाठी रावेत येथील ‘मेट्रो इको पार्क’मधील वृक्षतोड करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केली आहे.

काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड  

‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान  उपक्रम राबवण्यात आला.

वृक्षलागवडीचा चौकशी अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करा !

राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवडीचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.