(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे, हे गंभीर आहे !’

ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?

खासदार उदयनराजे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.

जेजुरी येथे पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !

जुरीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.

काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष ! – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.

पं. भीमसेन जोशी हे मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा दुवा होते ! – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही; पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे.

शरद पवार कधी क्रिकेट खेळले नसतांनाही ते अध्यक्ष होते ! – सदाभाऊ खोत, रयतक्रांती संघटना

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

उद्योगपती अदानी शरद पवार यांच्याकडे येऊन गेल्यानंतर सरकारने वीज देयक माफ न करण्याचा निर्णय घेतला !

वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.

राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात एल्गार परिषदेचे आयोजन करणार ! – विनायक मेटे, प्रमुख, शिवसंग्राम पक्ष

प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी ३० जानेवारी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !