प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी सतर्क रहाणे आवश्यक ! – स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज, शिवसदन आश्रम, हरिद्वार

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची घेण्यात आली सदिच्छा भेट !

हरिद्वार येथील सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हटले. महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज आणि पू. सौरभ जोशी यांची भावभेट !

पू. सौरभदादा म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा एकरूप झाल्याचे उदाहरण आहे. ते सतत आनंदात असतात. त्यांच्याकडे भक्तीभाव असलेला मनुष्य आला की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.