हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – प्रत्येक साधूसंतांनी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी संतांनी पुढे आले पाहिजे. असे झाले, तरच संतांवरील आघात (आक्रमणे) अल्प होतील, असे प्रतिपादन येथील श्री पंचायती नया उदासीन निर्वाण आणि सीताराम आश्रमाचे स्वामी सुरेश महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हणाले. या प्रसंगी महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.
| स्वामी सुरेश महाराज यांचा परिचय
स्वामी सुरेश महाराज हे पंजाबमध्ये गोरक्षण, संस्कृती रक्षण आणि धर्मांतर यांविषयी भक्तांमध्ये जनजागृती करतात. |

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर