हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार, १३ एप्रिल (वार्ता.) – प्रत्येक साधूसंतांनी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी संतांनी पुढे आले पाहिजे. असे झाले, तरच संतांवरील आघात (आक्रमणे) अल्प होतील, असे प्रतिपादन येथील श्री पंचायती नया उदासीन निर्वाण आणि सीताराम आश्रमाचे स्वामी सुरेश महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हणाले. या प्रसंगी महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.
| स्वामी सुरेश महाराज यांचा परिचय
स्वामी सुरेश महाराज हे पंजाबमध्ये गोरक्षण, संस्कृती रक्षण आणि धर्मांतर यांविषयी भक्तांमध्ये जनजागृती करतात. |

राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !