सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह २ जणांना अटक !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे !

मध्यप्रदेशात ३०० जणांची, तर छत्तीसगडमध्ये ७० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

या हिंदूंना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले होते. नाताळच्या दिवशीच हा कार्यक्रम पार पडला.

धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना युवकांनी पिटाळले !

ख्रिस्ती मिशनरी लोकांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत होते. याला स्थानिक आदिवासी युवकांनी विरोध केला, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी दिली .

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर (जिल्हा सांगली) बंद !

रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

हिंदूंचे धर्मांतर होत असल्यावरून ३० युवकांकडून नाताळच्या कार्यक्रमावर आक्रमण

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे विविध माध्यमांतून धर्मांतर केले जात आहे, हे जगजाहीर असतांना त्याला अजूनही पायबंद घातला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !

धर्मांतरबंदीसाठी सक्षम कायदा हवा !

काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !

लव्ह जिहादचे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धा वालकरचे तुकडे करण्यापर्यंत !

११ आणि १८ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्या क्लृप्त्या, ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची धोकादायक मानसिकता, विदेशातही लव्ह जिहाद आणि प्रेम असेल, तर धर्मांतराची आवश्यकता का ? ’, आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग ३) १३. … Read more

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.