मालवण येथे जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदर विभागाची कारवाई

१८ नोव्हेंबरला बंदर विभागाच्या पथकाने ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी राज्यशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगत अवैधपणे व्यवसाय करणार्‍या ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांवर कारवाई केली. या वेळी संतप्त व्यावसायिकांनी ‘कारवाई न थांबवल्यास समुद्रातच उपोषण करू’, अशी चेतावणी दिली

हुलजंती (जिल्हा सोलापूर) येथे महालिंगराया यात्रेच्या पालखी सोहळ्यात पोलिसांचा लाठीमार

हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी पालख्यांसमवेतचे भाविक, तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकार्‍यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार्‍यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

सोलापूर येथे वसुबारसच्या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला

आपण जन्माला येतांना सुख, दुःख, गुण आणि दोष हेही समवेत घेऊन येतो; मात्र सद्गुरूंची सेवा करतांना आपण घेऊन आलेले दोष न्यून होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचे परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते.

दुर्गनाद प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी केलेल्या कवलापूर (जिल्हा सांगली) येथील सिंहगडाच्या प्रतिकृतीचे अनावरण !

दुर्गनाद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी ३ मासांच्या अथक प्रयत्नांनंतर कवलापूर येथे सिंहगडाची प्रतिकृती साकार केली आहे.

वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.

आरेतील ८० टक्के झोपड्या विजेपासून वंचित

आरे वसाहतीतील ८० टक्के झोपड्यांमध्ये अद्यापही वीजपुरवठा नाही. आरेत ६ सहस्रांहून अधिक झोपड्यांची नोंद वर्ष १९९५ मध्ये करण्यात आली आहे. आता त्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती; मात्र सध्या कोरोनाचे प्रमाण न्यून होत असल्याने अनेक मासांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.